आलापल्ली:- स्वराज्य फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेमुळे वाचले दोघांचे प्राण गडचिरोली प्रतिनिधी-भास्कर फरकडे

 आलापल्ली:- स्वराज्य फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेमुळे वाचले दोघांचे प्राण

 गडचिरोली प्रतिनिधी-भास्कर फरकडे




आलापल्ली येथील. स्वराज्य फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेने अपघातातील जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचविल्याने दोघांचे प्राण वाचले आहेत.रूपेश दुमने (रा. मोयाबीनपेठा) हे काही कामानिमित्त आलापल्लीला आले होते. आपले काम आटोपून गावी जाण्यासाठी निघाले असता, आलापल्ली वरून तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीचे संतुलन बिघडून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. तिथून त्यांना काही लोकांनी मोददूमडगू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्रकृती खालावल्याने त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे नेणे गरजेचे होते. नातेवाईकांनी इकडे तिकडे संपर्क केला; पण कुठेही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. स्वराज्य फाऊंडेशन आलापल्लीच्या  पदाधिकाऱ्यांशी संपर्क केले असता स्वराज्य फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी हे आयुष्यमान भारत रुग्णालय येथे पोहोचून त्यांना स्वराज्य फौंडेशनच्या रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. दुसऱ्या एका घटनेत तोडसा येथील राणू गावडे काही कामानिमित्त आलापल्लीला आले होते. काम आटोपून परत आपल्या गावी जात असताना, आलापल्ली वरून तीन किलोमीटर अंतरावर मीम येथे त्यांच्या दुचाकीचे संतुलन बिघडू खाली पडले; त्यात ते गंभीर जखमी झाले. स्वराज्य फौंडेशनचे सदस्य समया चिंतावार हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनाही स्वराज्य रुग्णवाहिकेने रुग्णालयात भरती करण्यात आले. स्वराज्य फाउंडेशनच्या या मदतीने सर्वत्र कौतुक केले जात आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad